Monday 31 October 2011

जैन फाऊंडेशनचे उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार जाहीर

जळगाव - येथील भवरलाल अँण्ड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाउंडेशन आणि बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणाऱ्या साहित्यि पुरस्कारांची निवड काल जैन हिल्स येथे झालेल्या निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी जाहीर केली. बहिणाई सर्वोत्कृष्ट लेखिका पुरस्कार अनुराधा पाटील यांना, बालकवी ठोमरे सर्वोत्कृष्ट कवी पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना तर ना. धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्यलेखक पुरस्कार सदानंद देशमुख यांना जाहीर करण्यात आला.

साहित्य क्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारात बहिणाई सर्वोत्कृष्ट लेखिका पुरस्कार, बालकवी ठोमरे सर्वोत्कृष्ट कवी पुरस्कार आणि
ना. धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्यलेखक पुरस्कारांचा समावेश आहे. नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पुरस्कार समितीची बैठक आज जैन हिल्स येथे झाली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री सन्मानित मधू मंगेश कर्णिक, ज्येष्ठ कवी पद्मश्री सन्मानित ना.धों. महानोर, ज्येष्ठ समीक्षक गो. मा. पवार, साहित्यिक रवींद्र इंगळे चावरेकर, साहित्यिका डॉ. हेमा जावडेकर, डॉ. वृंदा भार्गवे, बहिणाबाई चौधरी मेमोरिअल ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती अशोक जैन, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन हे या निवड समितीचे सदस्य आहेत. मराठी साहित्यात विविध संस्थांतर्फे पुरस्कार दिले जातात. हे लक्षात घेऊन पुरस्कारार्थींची निवड अचूक व्हावी या उद्देशाने ही समिती अधिक व्यापक करण्यात आली. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष भवरलाल जैन यांना समितीने विशेष निमंत्रित म्हणून बोलाविले होते.

पुरस्कारांसाठी समितीने महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून शिफारशी मागविल्या होत्या. यात बहिणाई सर्वोत्कृष्ट लेखिका पुरस्कार अनुराधा पाटील यांना, बालकवी ठोमरे सर्वोत्कृष्ट कवी पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना तर ना. धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्यलेखक पुरस्कार सदानंद देशमुख यांना जाहीर करण्यात आला.

येत्या जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे पुरस्कार जळगाव येथे विशेष समारंभात प्रदान केले जाणार आहेत. या द्विवार्षिक पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी रोख 51 हजार रुपये, शाल, स्मृतीचिन्ह व श्रीफळ असे आहे. भवरलाल जैन यांनी पुरस्कारामागची भूमिका निवड समितीच्या सदस्यांसमोर विशद केली.

Sunday 30 October 2011

सोशल नेटवर्किंग गरज की व्यसन?

इंटरनेट क्षेत्रातील बदलामुळे जगभरातील कोणतीही माहिती एका सेकंदात उपलब्ध होऊ शकते; मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगचा वापर युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. वापरामागे विविध कारणेही आहेत. यामुळे अपडेट राहायला मदत होते. शिवाय, नवनवीन माहिती मिळण्यास मदत होते. नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे सोशल नेटवर्किंगचे जेवढे फायदे तेवढेच तोटेही. मात्र इंटरनेटच्या फायद्या-तोट्याचे गणित अनेकांना अद्याप समजलेले नाही. सोशल नेटवर्किंगच्या अतिरेकामुळे वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजारही होत असतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वापर हे व्यसनच असून, योग्य वेळी थांबवणे गरजेचे आहे.

सोशल नेटवर्किंग म्हणजे नेमके आहे तरी काय? असा प्रश्‍नही अनेकांसमोर उभा राहतो. इंटरनेटचा वापर हा सोशल नेटवर्किंगसाठी सर्वाधिक वापरला जातोय. सोशल नेटवर्किंगला भारतातल्या इंटरनेट युजरकडून सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळेच "गुगल' ही सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असलेली कंपनी प्रथम भारतातल्या युजरचा विचार करते. सोशल नेटवर्किंगसाठी फेसबुक, ट्विटर, एफबी, ऑर्कूट, चॅटिंग असे अनेक पर्याय युजर्सपुढे उपलब्ध आहेत. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, भारतातला 75 टक्के युजर हा 35 वर्षाच्या आतील वयाचा आहे. भारतातील युजर इंटरनेटसाठी आठवड्याला किमान साडेबारा तास वेळ देतात. दिवसातले अनेक तास इंटरनेटवर घालविणाऱ्यांची संख्याही मोठी असून, दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
ट्विटरमुळे अनेक जण सेकंदा-सेकंदाला आपली वैयक्तिक माहिती अपलोड करताना दिसतात. शिवाय यू-ट्यूबच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ अपलोड करता येत असल्यामुळे दर सेकंदाला ठिकठिकाणचे व्हिडिओ अपलोड होताना दिसतात. जगात कोणतीही घटना घडली तरी काही वेळातच त्याचे व्हिडिओ यू ट्यूबर उपलब्ध होतात. सोशल नेटवर्किंगच्या प्रभावी माध्यमामुळे अनेकजण इंटरनेटच्या सतत संपर्कात राहतात. माहिती तंत्रज्ञानातील बदलामुळे मोबाईलमध्येही अनेक बदल झाले आहेत. सोशल नेटवर्किंगच्या सेवा मोबाईलमध्ये उपलब्ध असल्यामुळे, अनेक जण मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे.

इंटरनेटसारख्या माध्यमामुळे अगदी मोकळेपणाने युजर्सला आपली मते समोरच्या व्यक्तीसमोर मांडता येतात. शिवाय, माहितीची देवाण-घेवाणही मोठ्या प्रमाणात होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती मिळत राहते. इंटरनेट विश्‍व हे माहितीचा खजिना असल्यामुळे प्रत्येक जण नवनवीन माहितीच्या शोधात असतो. सोशल नेटवर्किंगचे हे फायदे आहेत, यात तीळमात्र शंका नाही. परंतु काही प्रमाणात तोटेही आहेत, हेही आपल्याला मान्य करावे लागेल. खरे तर सोशल नेटवर्किंगचा वापर आपण कसा करतो, यावर सर्व काही अवलंबून असते. मध्यंतरी सोशल नेटवर्किंगचा तोटाही अनेक देशांना बसला. त्यानंतर सोशल नेटवर्किंगवर बंदी असावी, की काही प्रमाणात निर्बंध लादावेत, यावर अनेक तज्ज्ञांनी आपली मते मांडली.

सोशल नेटवर्किंगचा वापर युवकांमध्ये एवढा वाढला आहे, की अनेक जण तासन्‌ तास आपला वेळ इंटरनेटवर घालवताना दिसतात. एक तास, एक दिवस जर इंटरनेटची सेवा कोलमडली तर काय होईल? याचा विचार न केलेलाच बरा. अनेक जण फेसबुकवर पहाटेपासून ते रात्री झोपेपर्यंत अपडेट करत असतात. इंटरनेटच्या अतिवापरामुळे घरातील सदस्यांशी बोलणे कमी झाले आहे. म्हणूनच सर्दी, खोकला झाल्याचे सर्वात प्रथम सोशल नेटवर्किंगवरील मित्रांना समजते, त्यानंतर घरात व्यक्तींना माहिती होते. मैदानी खेळही कमी होत चालल्यामुळे शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. इंटरनेटचे स्पीड कमी झाले तरी चिडखोरपणा वाढताना दिसतो. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे इंटरनेट ही काळाची गरज होऊन बसली आहे. ई-मेल तपासणे, जगभरातील माहिती घेत राहणे यासाठी इंटरनेटचा वापर योग्य आहे. परंतु सहा तासांहून अधिक काळ जर इंटरनेट वापरात असाल, तर व्यसनाच्या आहारी गेल्याचे समजावे. यासाठी आपण स्वतः काही निर्बंध लादून घ्यायला हवेत. इंटरनेटमुळे जग जवळ येऊन ठेपले आहे, माहिती मिळत आहे, हे अगदी बरोबर. परंतु इंटरनेट नसल्यामुळे चिडचिडेपणा वाढत असेल, काही सुचत नसेल तर ते मग व्यसनच. त्यामुळे व्यसनाच्या आहारी जायचे की माहितीसाठी इंटरनेटचा वापर करायचा हे प्रत्येकाने ठरविणेच योग्य ठरेल.

सोशल नेटवर्किंग हे खरोखरच प्रभावी माध्यम आहे. परंतु त्याच्या आहारी जाणे हेही एक व्यसनच. इंटरनेटमुळे एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मात्र त्यातील धोक्‍यांपासून प्रत्येकाने सावध राहण्याची आवश्‍यकता आहे.

इंटरनेटचे फायदे -
- जगभरातील नवनवीन घडामोडी समजण्यास मदत.
- आपले मत मांडण्यासाठी मोठे व्यासपीठ.
- सोशल नेटवर्किंगसारखे अनेक पर्याय खुले.
- काही सेकंदातच जगभरातून ई-मेल मिळू शकतात.
- जगभरातील माहिती खजिना उपलब्ध.

इंटरनेटचे तोटे -
- मैदानी खेळामुळे कमी झाल्यामुळे शारीरिक व्याधी.
- मानसिक आजार होण्याची शक्‍यता.
- चिडचिडेपणात वाढ.
- वैयक्तिक माहितीचा इंटरनेट क्षेत्रात गैरवापर होण्याची शक्‍यता.
- इंटरनेटच्या अतिवापरामुळे कुटुंबातील सदस्यांची चर्चा कमी होण्याची शक्‍यता.

संतोष धायबर

Tuesday 25 October 2011

दिव्य मराठीने केला बंद माल सुरु

औरंगाबाद - दिव्य मराठीचे दर रोज मजेदार किस्से समोर येत आहेत. दैनंदिन बातम्या कमी आणि टुकार लेख देण्यात धन्यता मानणारे हे वृत्तपत्र आता बंद पडलेले मालहि सुरु करत आहेत. दिव्य कन्या रोशनी शिंपीला श्रीकांत सराफ यांनी एक टुकार बातमी  करायला सांगितली. आज २५ ऑक्टोबरच्या दिव्य सिटीच्या पान २ वर दिवाळीत हाईटेक  बाजार हाट या शीर्षक खाली ती बातमी प्रसीद झाली आहे. वास्तविक पाहता हे बीट भाग्यश्री बाप्ते नावाच्या ट्रेनी रिपोर्टरचे आहे. पण श्रींच्या मार्जीमुळे रोशनीला वाटेल तेथे शिंपले वेचण्याची परवानगी आहे. असो, नेहमीप्रमाणे ट्रेनी रिपोर्टर शिंपीने या बातमीत भरपूर चुका केल्या. या बातमीत शहरातील प्रमुख मालचे नावे टाकली आहेत. यात सहा  मालची नवे टाकण्यात आली आहेत. दोन नंबरवर विशाल मेगा मार्ट असे नाव आहे.  मात्र हा माल बंद पडून एक वर्ष झाले. सराफ साहेब पूर्वी काम करत असलेल्या सकाळमध्ये याची बातमी आली होती. तसेच सर्वच मेडियाने या घटनेची दाखल घेतली होती. तरीही या मालचे नाव टाकून शिंपल्यासहित तिचा बॉस सराफ आणि त्याचा बॉस देविदास लांजेवार यांनी नकळत बंद पडलेला माल सुरु केला आहे. खास दिवाळी निमित्त असे बंद माल सुरु झाले तर हि खरच आनंदाची बातमी ठरेल. याच बातमीत शिम्पीने reliance फ्रेश माल चा उल्लेख केला आहे. या मालमध्ये भाज्या आणि फळे मिळतात. यात कोणती आली हाईटेक खरीदी असा प्रश्न पडतो. श्रींच्या आशीर्वादानेच हे घडत असल्याचे समजते.
ता.क . आता रोशनी शिंपी हीच शहर प्रतिनिधींवर लक्ष ठेवेते. मीटिंगला जाण्याची सूचना तीच देते आणि परस्पर तीच कामे सांगते. हीच श्रींची इच्छा असावी.

Monday 24 October 2011

विकिलिक्स प्रकाशन थांबवणार

विकिलिक्सनं आपलं प्रकाशन थांबवण्याचा निर्णय घेतलाय. आर्थिक अडचणींमुळे आपण प्रकाशन थांबवत असल्याचं विकिलिक्सनं म्हटलंय. पैसे जमवण्यासाठी लवकरच एक अभियान सुरू करणार असल्याचंही विकिलिक्सकडून सांगण्यात आलंय.

विकिलिक्सला आर्थिक क्षेत्रातील काही अमेरिकन कंपन्यांनी पैसे देणे बंद केलंय. विकिलिक्सच्या समूहाने अमेरिकन सरकारच्या हजारो गुप्त फाईली आणि राजकीय केबल्सची माहिती इंटरनेटवर प्रकाशित केली होती.

विकिलिक्सनं अमेरिकन सरकारची चिंता वाढवली होती. अमेरिकन सरकारचं नाही तर मनमोहन सिंह सरकारच्या निर्णयांविषयी माहिती विकिलिक्सनं उजेडात आणली. यामुळे भारतीय राजकारणात वादळंही उभं राहिलं होतं.

फक्त काँग्रेसचं नाही तर भाजप आणि हिदुत्ववाद्यांविषयीही विकिलिक्सनं माहिती समोर आणली होती. यामुळेही भारतीय राजकारणात विकिलिक्स चर्चेत आलं होतं.
विकिलिक्सनं आपलं प्रकाशन थांबवण्याचा निर्णय घेतलाय. आर्थिक अडचणींमुळे आपण प्रकाशन थांबवत असल्याचं विकिलिक्सनं म्हटलंय. पैसे जमवण्यासाठी लवकरच एक अभियान सुरू करणार असल्याचंही विकिलिक्सकडून सांगण्यात आलंय.

विकिलिक्सला आर्थिक क्षेत्रातील काही अमेरिकन कंपन्यांनी पैसे देणे बंद केलंय. विकिलिक्सच्या समूहाने अमेरिकन सरकारच्या हजारो गुप्त फाईली आणि राजकीय केबल्सची माहिती इंटरनेटवर प्रकाशित केली होती.

विकिलिक्सनं अमेरिकन सरकारची चिंता वाढवली होती. अमेरिकन सरकारचं नाही तर मनमोहन सिंह सरकारच्या निर्णयांविषयी माहिती विकिलिक्सनं उजेडात आणली. यामुळे भारतीय राजकारणात वादळंही उभं राहिलं होतं.

फक्त काँग्रेसचं नाही तर भाजप आणि हिदुत्ववाद्यांविषयीही विकिलिक्सनं माहिती समोर आणली होती. यामुळेही भारतीय राजकारणात विकिलिक्स चर्चेत आलं होतं.

Sunday 2 October 2011

वाहिन्यांवरील एरंडाचे गुऱ्हाळ

नको त्या गोष्टींना अनावश्यक महत्त्व देउन वृत्तवाहिन्या किती सुमार कामगिरी करीत आहेत हे गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. आपण देत असलेले वृत्त हे विश्वासार्ह नाही तर करमणूक प्रधान असले पाहिजे असल्या विचाराने प्रेरीत होउन बातम्यांचे सादरीकरण केले जात आहे. त्यामध्ये आपल्या अनावश्यक केलेल्या गोष्टींमुळे काही चांगल्या व्य्नितंच्या अवमुल्यनाचा प्रकार होत आहे याचे भान या वाहिन्यांना राहिलेले नाही. काही व्य्नितंना किती महत्त्व द्यायचे हे या वाहिन्या विचारात घेत नाहीत. मागच्या आठवड्यापासून अशीच गाजत असलेली एक बातमी म्हणजे शोएब अख्तरच्या आत्मचरीत्रावरून अनावश्यक वाद निर्माण केला गेला जात आहे. त्यात म्हणे त्याने सचिन तेंडूलकरवर टीका केली आहे. सचिन आपल्याला घाबरतो असे लिखाण केले आहे त्यामुळे त्या बातमीवर लगेच एरंडाचे गुऱ्हाळ सुरू केले. या बातमीला महत्त्व देण्याइतकी ती मोठी बातमी होती काय? कारण नसताना शोएब अख्तरच्या पुस्तकाची फुकटात प्रसिद्धी मात्र या वृत्तवाहिन्यांनी केली. हा सगळा वृत्तवाहिन्यांच्या भोंगळ कारभार आहे. त्या शोएब अख्तरच्या पुस्तकातील एक पानही न वाचता त्यावर चर्चा करणे हा च्नक वेडेपणा म्हणावा लागेल. कोणीतरी सांगतो की शोएब अख्तरने सचिन तेंडूलकर मला घाबरतो असे त्याच्या पुस्तकात लिहीले आहे की लगेच शोएबचा निषेध सुरू. सचिन कसा महान आहे. तो कसा स्निसर मारतो. त्याने किती धावा काढल्या आहेत हे सांगण्यासाठी वृत्त वाहिन्यांवर मग चढाओढ सुरू झाली. अत्यंत सवंग आणि सुमार कामगिरी म्हणून या प्रकाराकडे पहावे लागेल. आपण इथं बसून फालतू रटाळ चर्चा करून शोएब अख्तरच्या पुस्तकातला मजकूर बदलणार आहे काय? ते पुस्तक प्रकाशित झाले नाही. मार्केटमध्ये आलेही नाही. त्यापुर्वीच हे चर्चाचर्विचरण कशासाठी केले याचे कोणाकडेही उत्तर नाही. पण या चर्चेमुळे सचिनचे अवमूल्यन करण्याचे काम मात्र वाहिन्यांनी केले. शोएब तर दुसऱ्या देशाचा त्यातून पाकीस्तानी माणूस आहे. त्यांच्याकडून भारतातल्या प्रत्येक गोष्टीवर टीका येणेच अपेक्षित असताना आपण इथं बसून शोएबला का महत्त्व देत बसलो हे एकाही वृत्तवाहिनीला समजले नाही. दाखवायला चांगल्या बातम्या नाहीत, शोधक आणि कल्पक बुद्धी नाही कसला विचार नाही त्यामुळेच नको त्या कार्यक्रमांना, नको त्या गोष्टींना ठळकपणे प्रसिद्धी देण्याचे काम केले जाते. झी 24 तास, आयबीएन लोकमत आणि स्टार माझा या वाहिन्या अक्षरश: सचिन आणि शोएब याशिवाय दोन दोन दिवस काहीही दाखवत नव्हत्या. त्यानंतर पुन्हा एकदा शोएब अख्तरच्या भूमिकेचे शाहीद अफ्रिदीने समर्थन केले म्हणून त्याच्या टिकेचे सत्र दिवसभर चालवले. शोएब आला की सचिनचे पाय लटपटायचे हे वृत्त दिवसभर दाखवून तथाकथीत तज्ज्ञांची त्यावर मते घेउन सचिन कसा महान आहे हे पटवून देण्याचा आटापिटा वाहिन्यांनी केला. काही गरज नव्हती या गोष्टीची. शेंदाड शिपाई किंवा भेदरट माणसं अशा गोष्टी नेहमीच करतात. एखादं पाप्याचं पितर असतं ते शाळेतून आडदांड मुलाचा मार खाउन येतं. आणि ज्या कोणाला माहित नाही त्यांना ते पाप्याचं पितर सांगतं की मी त्या आडदांड मुलाला मारलं. याला फुशारकी मारणे असे म्हणतात. तोच प्रकार शाहीद अफ्रिदी आणि शोएब अख्तर यांनी केलेला आहे. अख्तर काय फ्नत भारताविरोधातच सामने खेळला काय? जगातल्या सर्व देशांबरोबर त्याने सामने खेळले आहेत. पण सचिन मला घाबरायचा असे तो म्हणतो याचा अर्थच सचिन सर्वश्रेष्ठ आहे हे त्याने मान्य केले आहे. त्यामुळे या चर्चा आणि बातम्यांना इतकी प्रसिद्धी देण्याची काहीच गरज नव्हती. आज महाराष्ट्रात असंख्य समस्या आहेत. महागाई आहे, भ्रष्टाचार आहे, अनागोंदी आहे. सरकारने शिक्षणाचे वाटोळे केले आहे. शिक्षणात भ्रष्टाचार झाला आहे. या विषयांकडे एकाही वाहिनीचे लक्ष नाही. सरकारला बदलायला लावायची ताकद वृत्त वाहिन्यांमध्ये असताना ते काम न करता फालतू गोष्टींवर चर्चा करण्यात या वाहिन्या गुंतल्याने सखेद आश्चर्य वाटल्या वाचून रहात नाही. तोच प्रकार दोन दिवसांपुर्वी पुन्हा एकदा केला गेला. लता मंगेशकर यांना अमिताभ बच्चन यांच्या हस्ते हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी लता मंगेशकर यांनी अमिताभ बच्चन यांना भारतरत्न द्यावे अशी अपेक्षा व्य्नत केली. अपेक्षा व्य्नत केली म्हणजे काही सरकार लगेच त्याची घोषणा करणार नव्हते. पण झी 24 तासवरून त्यावर रोखठोक कार्यक्रम घेतला. त्यात अगदी विश्वास मेहेंदळेंपासून ज्येष्ठ पत्रकारांना समाविष्ट करून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू केले. काही आवश्यकता होती काय याची? त्या कार्यक्रमात मग अमिताभ आणि लता मंगेशकर यांच्यावर टीकेचा सूर आला. त्यांनी भरपूर पैसे कमावले आहेत त्यामुळे लता मंगेशकर आणि अमिताभ यांना भारतरत्न देउ नये असे एका विद्वानाने व्य्नत केले. म्हणजे लता मंगेशकर यांना आधिच तो पुरस्कार दिला गेला आहे याचेही भान नव्हते. एका महाशयांनी महात्मा गांधींना हा पुरस्कार का दिला नाही म्हणून मुद्दा उपस्थित केला तर एकाने मेधा पाटकर यांना हा पुरस्कार द्यावा अशी मागणी केली. कशाचाही कशाशीही संबंध नसलेली ही चर्चा घडवली गेली. काही वैचारीक चर्चा करायला या वाहिनीकडे मुद्दे नाहीत काय? शिक्षणातील अनागोंदी प्रकाराबाबत का नाही चर्चा घडवली? या असल्या फालतू चर्चांना रोखठोक काय उधारही पहायला कोणाला आवडत नाहीत. ज्या कोणी मेधा पाटकर यांचे नाव सुचवले त्या मुद्याचा आधार घेउन का नाही अशी एखादी चर्चा वाहिनीवर घडवली गेली की मेधा पाटकर यांचे आंदोलन किती खरे किती पोकळ? पंचवीस वर्ष त्या नर्मदेच्या खोऱ्यात ठाण मांडून बसल्या आहेत. त्याने काय साध्य झाले? मेधा पाटकर यांचे नाव या आंदोलनामुळे गिनीज बुकमध्ये नोंदवा अशी मागणी करायला पाहिजे. पण त्यांचे आंदोलन नेमके काय आहे याबाबत चर्चा का नाही कधी घडवली? आपल्याकडे लोकांच्या अनेक कृतींचे आकलन अनेकांना होत नसते. त्याचे आकलन होण्यासाठी अशा चर्चा घडवणे आवश्यक असते. अण्णांच्या आंदोलनामुळे मागचा बाजार चांगला गेला. पण त्यानंतर काही विषय मिळेनात म्हटल्यावर सचिन, लता, अमिताभ यांना कुठेतरी टच करण्याचा प्रयत्न केला गेला. जितेंद्र आव्हाड नामक राष्ट्रवादीच्या आक्रमक आमदारांनी लगेच शोएब अख्तरचा कोणताही कार्यक्रम होउ देणार नाही. त्याला विरोध केला जाईल. अशी ब्रेकींग न्यूज या वाहिनीने सोडली. ज्या मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड निवडून आले आहेत त्या भागातून पाकीस्तानी, बांग्लादेशी घुसखोर हाकलून लावू अशी प्रतिज्ञा का नाही आव्हाडांनी केली? आपली धाव ज्या कुंपणापर्यंत आहे तिथे आपण काही करू शकत नाही आणि कुंपणाबाहेर भुंकायला कशासाठी जायचे? या बातमीला महत्त्व देण्याची गरज होती काय? वृत्त वाहिन्यांच्या अशा सुमार आणि अनावश्यक कामगिरीमुळे चित्रपटांप्रमाणेच एखादे सेन्सॉर बोर्ड नेमावे असे वाटते.

प्रफुल्ल फडके
संपादक कर्नाळा
पनवेल