Wednesday, 27 June 2012

आषाढी एकादशीच्या दिवशी 'रिंगण' आषाढी अंकाचं प्रकाशन

रिंगण या पहिल्या आषाढी अंकाचं प्रकाशन आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे शनिवार ३० जून रोजी पंढपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतेय. देशभर फिरून केलेले रिपोर्ताज, मान्यवर अभ्यासकांचं नामदेवांविषयीचं चिंतन आणि भास्कर हांडे या आंतरराष्ट्रीय चित्रकाराने मुखपृष्ठावर साकारलेले अभ्यासपू्र्ण नामदेव, अशी या अंकाची काही वैशिष्ट्य.

आपल्याकडे दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा आहे. गुढीपाडवा आणि गणपतीचेही विशेषांकही निघतात. आषाढीची वारी हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा. मग आषाढी अंक का नाही? म्हणूनच 'आषाढीचा वार्षिक अंक' ही नवी संकल्पना यंदाच्या आषाढी एकादशीपासून प्रत्यक्षात येत आहे. 'रिंगण' नावाने सुरु होणा-या या वार्षिकाच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन आषाढी एकादशीला म्हणजे शनिवार ३० जूनच्या पहाटे पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

यावर्षीपासून 'रिंगण' दर आषाढी वारीला प्रसिद्ध होणार आहे. त्यात महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा सामाजिक, सांस्कृतिक अंगाने मागोवा असेल. दरवर्षी एक संत आधुनिक दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न त्यात असेल. कारण गेली आठशे वर्षे संतपरंपरा हाच महाराष्ट्राचा मुख्य सांस्कृतिक प्रवाह आहे. यात अध्यात्मासोबतच सामाजिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. हा दृष्टिकोन आजच्या काळानुसार मांडणं हा या अंकामागचा उद्देश आहे.

या वर्षीचा विशेषांक संतशिरोमणी नामदेवांवर आहे. आठशे वर्षांपूर्वी समतेच्या विचारांची ध्वजा घेऊन नामदेवराय तामिळनाडू ते सिंध पंजाबपर्यंत फिरले. त्यांनी अनेक भाषांमध्ये लिहिलं. नानक, कबीर, नरसी मेहता, मीरा, रोहिदास अशा उत्तरेतील संतपरंपरेचा पाया घातला. महाराष्ट्रातील वारकरी परंपरेला आकार दिला. सर्व जातीच्या संतांना एकत्र केलं. चंद्रभागेच्या तीरावर क्रांती केली. म्हणूनच आज देशभर श्री विठ्ठलापेक्षाही नामदेवांची मंदिरं जास्त आहेत. पाकिस्तानातही त्यांची मंदिरं आहे. देशातील लाखो लोक त्यांचं नाव आपली ओळख म्हणून लावतात. त्यांच्या या कार्याची ओळख यंदाच्या 'रिंगण'च्या १२० पानी अंकातून करून देण्यात आली आहे.

सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड या पत्रकारांनी 'रिंगण' चं संपादन केलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रशिल्पकार भास्कर हांडे यांनी चितारलेलं नामदेवांचं अत्यंत अभ्यासपूर्ण असं रूप 'रिंगण' च्या मुखपृष्ठावर आहे. उत्तर भारतात पंजाब (नीलेश बने), दिल्ली (गिरीश अवघडे), राजस्थान (दानाराम छिपा), गुजरात (धवल पटेल) असं जिथपर्यंत नामदेव गेले त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन लिहिलेले स्पेशल रिपोर्ट या अंकात आहेत. याशिवाय नरसी नामदेव हे नामदेवांचं जन्मगाव (प्रशांत जाधव), पंढरपूर ही कर्मभूमी (पराग पाटील) या ठिकाणी जाऊन केलेलेही रिपोर्ताज यात वाचायला मिळतील. अनेक मान्यवरांचे नामदेवांविषयचे लेख यात आहेत. भालचंद्र नेमाडे, भारतकुमार राऊत, अशोक कामत, नि. ना. रेळेकर, रामदास डांगे, वीणा मनचंदा, शिवाजारीव मोहिते, संजय सोनवणी, आप्पासाहेब पुजारी, मंगला सासवडे, सुनील यावलीकर, दिलीप जोशी, श्यामसुंदर सोन्नर, अंजली मालकर अशा मान्यवर लेखकांचं नामदेवांविषयीचं चिंतन यात आहे. आपले आडनाव नामदेव लावणा-या महाराष्ट्राबाहेरच्या लाखो लोकांचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांची हर्षदा परब यांनी घेतलेली मुलाखत तसेच लंडन येथील खालसा कॉलेजच्या प्राचार्य डॉ. माधवी आमडेकर यांचा लेख यातून ग्लोबल नामदेव समोर आलेले आहेत. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या साठीनिमित्त त्यांची राजा कांदळकर यांनी घेतलेली प्रदीर्घ मुलाखत या अंकाचं आकर्षण ठरावे.

आषाढी एकदाशीला पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापुजेनंतर पहिलं दर्शन घेणा-या वारक-यांचा सत्कार कार्यक्रम दरवर्षी होत असतो. त्याच कार्यक्रमात 'रिंगण' चं प्रकाशन होईल. याशिवायય www.ringan.in या वेबसाईटवरही लवकरच हा अंक जशाच्या तसा वाचता येईल. तसेच या अंकात घेता न आलेले लेख तसेच अंकात असलेल्या लेखांच्या सविस्तर आवृत्त्या यात वाचता येतील. शिवाय नामदेवांविषयीचे अंकात असलेले नसलेले फोटोही या वेबसाईटवर उपलब्ध असतील.

या १२० पानी देखण्या अंकाची किंमत फक्त ६० रुपये आहे. राज्यभरातील सर्व महत्त्वाच्या पुस्तकांच्या दुकानांत हा अंक विक्रीसाठी उपलब्ध असेल. मनोविकास प्रकाशना (०२०- ६५२६२९५०) तर्फे या पुस्तकाचं वितरण करण्यात आलंय.




संपर्कः सचिन परब ९९८७०३६८०५

Tuesday, 26 June 2012

विश्वास नांगरे पाटील यांना "आदित्य गौरव "पुरस्कार घोषित

औरंगाबाद - आदित्य प्रकाशनाच्या वतीने देण्यात येणारा "आदित्य गौरव "पुरस्कार विश्वास नांगरे पाटील   ( अतिरिक्त पोलिस आयुक्त, मुंबई )यांना घोषित झाला आहे .मागच्या वर्षी हा पुरस्कार समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना देण्यात आला होता.
आदित्य प्रकाशनाचे संचालक विलास फुटाणे यांच्या संकल्पनेतून सकालेला हा पुरस्कार हा दरवर्षी दिला जातो . विश्वास नांगरे पाटील यांनी २३/११ ला जो मुंबईवर आतंकी हल्ला झाला होता .तो हल्ला त्यांनी
तळहातावर प्राण घेऊन रोकला.होता त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे अनेकांचे प्राण वाचले .त्याच्या या कर्तव्य कठोर कार्याबद्दल त्याना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे

Monday, 25 June 2012

सोलापुरात सकाळवर वृत्तपत्र विक्रेत्यांचा बहिष्कार

सोलापूर - अंकाचे कमिशन वाढवून द्यावे, ही मागणी फेटाळून लावणा-या सकाळवर मंगळवार दि.२६ जून रोजी विक्रेत्यांनी बहिष्कार टाकला.त्यामुळे सोलापुरात सकाळचे वाटप झाले नाही.सकाळच्या ऐवजी विक्रेत्यांनी दिव्य मराठी व सुराज्यचे अंक टाकले.त्यामुळे सोलापुरात सकाळची मोठी कोंडी झाली आहे.गंभीर बाब म्हणजे  सकाळच्या एका अधिका-याने संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब लाड यांना अत्यंत खालच्या पातळीवर अपशब्द वापरले.त्यामुळे विक्रेत्यात संतापाची लाट पसरली आहे.

पुढील मजकूर वाचण्यासाठी क्लीक करा...

बेरक्या उर्फ नारद

Sunday, 24 June 2012

`सरहद'ने उठवला लोकमतकरांचा बाजार

पुण्यातील पत्रकारांची खाबुगिरी कोणत्या थराला गेली आहे आणि खालपासून् वरपर्यंत सगळीकडे कशी खाबुगिरी चालली आहे याचे  किस्से अनेकदा ऐकायला मिंळतात. पत्रकारीतेला कलंक असलेल्या या खाबू गटाची अंदाधुंदी गेल्या काही वर्षात भयानक वाढली आहे. त्यामुळे बिल्डर्स, शैक्षणिक संस्थांचे चालक आणि शासकीय अधिकारी त्रस्त झाले आहेत. त्याला लगाम घालण्याची आवश्यकता होती. `सरहद' या संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी अखेर मांजराच्या गळ्यात घंटा बांधलीच.

पुढील मजकूर बेरक्या उर्फ नारद ब्लॉगवर वाचा
बेरक्या उर्फ नारद

Saturday, 23 June 2012

ही बांबळे स्कूल काय भानगड आहे रे भौ....

नाशिकच्या मेरी परिसरातील आर टी ओ कॉलनीचा चौक. दुपारची 1 ची वेळ.
चौकाच्या बाजूला तीन आलिशान गाड्या थांबलेल्या. सिंघमफेम अजय देवगण,
दबंगफेम सलमान खान आणि राऊडी राठौरफेम अक्षयकुमार रस्त्यावर उभे राहून
पत्रकारीतेच्या बांबळे स्कूलचा पत्ता विचारत आहेत. नाशिककरांना अशा
कोणत्याही स्कूलचे नाव माहित नाही. तीघेजण सांगतात...अरे बाबा या स्कूलचे
चालक एक साखळी दैनिकाचे मुख्यसंपादक आहेत..

पुढील मजकूर झुंजार बातमीदार या ब्लॉगवर वाचा... 

झुंजार बातमीदार  

आवश्य वाचा..

महाराष्ट्रात वेब जर्नालिझममध्ये अव्वल असणा-या ज्येष्ठ पत्रकार  सुनील ढेपे (  मुख्य संपादक, उस्मानाबाद लाइव्ह ) यांच्यावर सकाळने काही दिवसांपुर्वी कॉपी राईटचा गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी सुनील ढेपे यांनी त्यांच्या उस्मानाबाद लाइव्ह या ई - पेपरवर घेतलेला खरपूस समाचार आवश्य वाचा..




माणुसकीचे नाते 

न केलेले गुन्हे  

Friday, 13 January 2012

सोशल नेटवर्किंग कंपन्या संकटात, न्यायालयीन कारवाईला सरकारचा हिरवा कंदिल


नवी दिल्ली : गूगल, फेसबुक, याहू आणि मायक्रोसॉफ्ट यासारख्या इंटरनेट कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी आवश्यक ती परवानगी केंद्र सरकारने जारी केली आहे. यासंदर्भात एका प्रकरणावर सुनावणी करताना दिल्लीतल्या पतियाला हाऊस कोर्टाने केंद्र सरकारला आज सायंकाळपर्यंत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.

गूगल, फेसुबक, याहू सारख्या साईट्सवर असलेला अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासंदर्भात न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात या याचिकेवर प्राथमिक सुनावणी करताना स्थानिक न्यायालयाने वेगवेगळ्या 22 इंटरनेट कंपन्यांना न्यायालयात हजर राहून आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. मात्र या कंपन्यांनी कोर्टाच्या एकाही समन्सला उत्तर दिलं नाही की स्वतः कोर्टात हजर राहिले. त्यामुळे आज कोर्टाने या सर्व कंपन्यांची खरडपट्टी काढत त्यांच्यावर कठोर म्हणजे चीन सरकारप्रमाणे बंदीही घालण्याची भूमिका घेतली होती.

त्यावर या सर्व बड्या इंटरनेट आणि सॉफ्टवेअर कंपन्यांनी आज दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत, कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या आदेशापासून सुटका करण्याची मागणी केली. मात्र त्यावर अजून काहीही निर्णय झालेला नाही.

दिल्ली कोर्टाने विदेशात मुख्यालय असलेल्या वेगवेगळ्या इंटरनेट, सॉफ्टवेअर आणि सोशल नेटवर्किंगमधल्या कंपन्याना समन्स बजावून आपल्या साईट्सवर अश्लील, आक्षेपार्ह तसंच धार्मिक तेढ वाढवणारा मजकूर अपलोड केल्याबद्धल गुन्हेगारी कारवाई क करू नये, अशी विचारणा केलीय. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जारी केलेल्या कायदेशीर समन्समध्ये या सर्व कंपन्यांना आपल्या वकीलामार्फत किंवा प्रतिनिधीमार्फत 13 मार्च रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

13 मार्च रोजी असलेल्या पुढील सुनावणीसाठी या कंपन्यांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहता यावं, यासाठी त्या सर्व कंपन्यांना नोटीस मिळणं गरजेचं आहे. त्यावर सरकारने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयावर संबंधित कंपन्यांपर्यंत कोर्टाचे समन्स पोहोचविण्याची जबाबदारी टाकली आहे.
गूगल फेसबुक
गूगल फेसबुक


आज न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये फेसबुकची बाजू मांडणाऱ्या वकीलाने न्यायालयाच्या ही बाब न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिली. कोर्टाने समन्स बजावलेल्या 21 पैकी तब्बल दहा कंपन्या ह्या भारताबाहेरच्या आहेत. त्यांना या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी प्रोसेस इश्यू करावा लागेल. त्यानंतर न्यायालयाने संबंधित कंपन्यांना समन्स इश्यू करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची मदत घेण्याचे आदेश जारी केले.

स्थानिक पत्रकार विनय राय यांनी दिल्लीतील पटियाला न्यायालयात धाखल केलेल्या एका खाजगी तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने सोशल नेटवर्किंग आणि इंटरनेट, सॉफ्टवेअर कंपन्याच्या विरोधात आक्षेपार्ह मजकुराबाबत ही कायदेशीर कारवाई सुरू केलीय.

कायदेशीर समन्स जारी करण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये गूगल, फेसबुक, यूट्यूब, मायक्रोसॉफ्ट आणि याहू यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या 13 मार्च या तारखेला समन्स बजावण्यात आलेल्या सर्व कंपन्यांना स्वतः हजर राहण्याचेही आदेश कोर्टाने दिलेत.

कोर्टाच्या निर्देशानंतर तक्रारकर्त्यांचे वकील शशी त्रिपाठी यांनी पुन्हा एकदा सुधारित पत्त्याची यादी न्यायालयाला देणार असल्याचं स्पष्ट केलं. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत संबंधित कंपन्यांना समन्स बजावण्यात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी आपण आवश्यक ती खबरदारी घएत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान फेसबुकचं प्रतिनिधीत्व करणारे वकील सिद्धार्थ लुथरा यांनी न्यायालयाला आजचं कामकाज स्थगित करून पुढची तारीख देण्याची विनंती केली, त्याचं कारण स्पष्ट करताना त्यांनी न्यायालयाला विनंती केली की, याच प्रकरणावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे, 16 तारखेला पुढील सुनावणी होणार आहे, दिल्ली उच्च न्यायालयाने यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत काहीही आदेश दिलेला नसल्यामुळे पतियाळा हाऊस कोर्टाचली सुनावणी एक दिवस पुढे ठकलण्याची विनंतीही त्यांनी केली. गूगलच्या वतीनेही अशीच विनंती न्यायालयाला करण्यात आली. गूगलने आपली बाजू मांडताना सांगितलं की न्यायालयाने यापूर्वी बजावलेल्या समन्स या ऑर्कूट, यूट्यूब आणि ब्लॉगस्पॉटच्या भारतातील कार्यालयांना बजावण्यात आल्या आहेत. यासर्व समन्स त्यांच्या मुख्यालयाला बजावण्यात आल्या पाहिजेत.

मात्र न्यायालयाने आजचं कामकाज स्थगित करून समन्स बजावण्यासाठी पुढची तारीख देत असतानाच केंद्र सरकारच्या माहिती-तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्रालयाला आदेश दिले की यासंदर्भात केंद्र सरकारची भूमिका काय आहे, ती आजच्या आज स्पष्ट व्हायला हवी. त्यावर माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वकीलाने आजच सरकार यासंदर्भात आपली भूमिका कोर्टात जाहीर करेल, असं न्यायालयाला सांगितलं. त्यानुसार केंद्र सरकारने आज परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत विदेशात मुख्यालय असलेल्या सर्व विदेशी कंपन्यांना नोटीस बजावून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

न्यायालयात सर्वप्रथम 23 डिसेंबर 2011 रोजी हा मुद्दा सुनावणीसाठी आल्यानंतर न्यायालयाने तब्बल 21 सोशल नेटवर्किंग कंपन्यांना नोटीसा बजावल्या. त्यावर या सर्व कंपन्यांच्या भारतातील प्रतिनिधींनी उच्च न्यायालयात धाव घेत परदेशातील मुख्यालयांना नोटीसा बजावल्या जाव्यात अशी मागणी केली, त्यावरील दिल्ली उच्च न्यायालयात पुढील सुनावणी 16 जानेवारी रोजी अपेक्षित आहे.

दरम्यान गूगलने मात्र यासंदर्भात आपली भूमिका स्पष्टस करताना गूगलवरील कोणताही कॉन्टेन्ट म्हणजेच आक्षेपार्ह असो की नसो, हटवण्यासंदर्भात काहीच कारवाई करता येत नसल्याचं स्पष्ट केलंय. गूगल ही एक बेवसाईट नसून ते फक्त सर्च इंजिन आहे, त्यामुळे गूगल स्वतः आशय किंवा मजकूर तयार करत नाही, अशी भूमिकाही गूगलने घेतली आहे. त्यांच्या या युक्तिवादावर न्यायालयाने संतप्त होत, तर मग गूगलवर चीनमध्ये आहेत, तसे निर्बंध का घालू नयेत, अशी विचारणाही केली.

सरकारने न्यायालयात आपली भूमिका स्पष्ट करताना संदर्भात सर्व 21 कंपन्यांवर गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई करता येईल एवढा सकृतदर्शनी प्राथमिक पुरावा असल्याचा अहवाल न्यायालयात दिला आहे. 

दिल्लीचे मेट्रोपॉलिटन जज सुदेश कुमार यांच्या न्यायालयात सरकारतर्फे सादर करण्यात आलेल्या अहवालात सांगण्यात आलं आहे की, ही परवानगी देणाऱ्या प्राधिकाऱ्याने सर्व तपशील स्वतः चाळला असून सोशल नेटवर्किंग, इंटरनेट आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या तब्बल 21 कंपन्यांवर गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई चालवता येईल, एवढा तपशील असल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. या सर्व कंपन्यांवर भारतीय दंड विधानाच्या 153 अ, 153 ब, 295अ नुसार कारवाई करता येईल, असंही सरकारने न्यायालयाला स्पष्ट केलं आहे.

अशा प्रकारचा अहवाल देण्याचा आदेश न्यायालयानेच आज सरकारला दिला होता. त्यानुसार माहिती तंत्रज्ञान विभागाने हा दोन पानी अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

Friday, 6 January 2012

'जिस्म २' चं वादळ

मुंबई - जिस्म २ या चित्रपटाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतचं चालली आहे. त्यातच आता निर्माती पूजा भट्टने या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. सध्या या चित्रपटाचे पोस्टरही बऱ्याच चर्चेत आहे.

जिस्म या चित्रपटानेही अशाच प्रकारे प्रेक्षकांमध्ये उत्सूकता निर्णाण केली होती. चित्रपटाचा तोच अंदाज कायम ठेवत जिस्म २ ची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात केवळ बोल्ड आणि सेन्शूअस दृष्यांचा मसाला घालण्यात आला आहे. चित्रपटाचे पोस्टर देखील तेच दर्शवतोय. हे पोस्टर पाहून अनेकांच्या मनात वादळ उठले आहे हे नक्की.

या चित्रपटाचे निर्मीती (प्रोड्यूसर) पुजा भट्टने केली आहे तर दिनो मोरीआने सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

Thursday, 5 January 2012

तृतीय पंथीयांचे संमेलन

नंदुरबार - उत्सुकता शिगेला पोहचविणार्‍या तृतीय पंथीयांच्या राष्ट्रीय संमेलनाला अक्कलकुवाजवळील सोरापाडा गावात प्रारंभ झाला. देशभरातील साडेतीनशेच्या आसपास तृतीय पंथीयांची संमेलनाला हजेरी लागली असून खिचडीची तुला करून या संमेलनाला पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. तर सोरापाड्याच्या राणीला नायक पद बहाल करण्यात आले.

अक्कलकुवाजवळील सोरापाडा या गावात राहणारी बुलबुल नायक या तृतीय पंथीयाने किन्नर समाजाची अर्थात तृतीय पंथीयांची स्थापना केली. बुलबुल नायकाच्या मृत्यूला दोन वर्ष होत आहेत. त्याच्या मृत्यूनंतर सोरापाडा गावात प्रथमच राष्ट्रीय संमेलन भरविण्यात आले. बुलबुल नायकाच्या जागेवर आज राणीला नायक पद बहाल करण्यात आले. या वेळी राणी नायक या तृतीय पंथीयाला आपले अर्शू अनावर झाले होते.

रेखा नायक बर्‍हाणपूर, जरीना नायक हैदराबाद, शबनम नायक, मीना नायक नागपूर, मुमताज नायक या पंचमंडळाच्या उपस्थितीत आज परंपरेनुसार संमेलनाला प्रारंभ झाला. ढोलक वाजवून गाणे गात तृतीय पंथीयांनी नृत्य केले. जयपूर, मध्य प्रदेश व खान्देशातील तृतीय पंथीय आज संमेलनात दाखल झाले. गुरू शिष्यांची परंपरा या तृतीय पंथीयात दिसली. गुरूंचा आदर राखतांना शिष्य कमालीचे शिस्त दाखवित होते. अत्तराचा सुगंध या संमेलनात दरवळत होता. प्रत्येक तृतीय पंथीयांच्या अंगावर सोन्याचे दागिने दिसत होते. विविध गावातून आलेल्या तृतीय पंथीयांनी रोख रक्कम जाहीर केली. राणी नायकाला नायक पद दिल्यानंतर या नायक पदाची लाज राख, अशी शपथ देण्यात आली. पंच मंडळाने नायकाला आशीर्वाद दिले. खिचडीची तुला करण्यामागे आपल्या पूर्वजांना र्शद्धांजली वाहणे, असा असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

सविताबाईचे सौंदर्य  
सोरापाड्यातील राष्ट्रीय संमेलनात देखणे तृतीय पंथीयांनी हजेरी लावली असून नागपूरहून आलेली राखीबाई, मुंबईहून आलेली सविताबाई या इतक्या देखण्या आहेत की कुठल्याही लावण्यवतीचे सौंदर्य त्यांच्या पुढे फिके पडावे. 



आम्हाला मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचे नाही. आम्हाला टीव्हीवर झळकायचे नाही. बस आम्हाला इतरांसाठी दुआ मागायची असते. आम्ही दुसर्‍यांसाठी शुभकामना करतो. आमचे पोशिंदे सुखाने जगले पाहिजेत म्हणून आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो. लग्न समारंभात आम्ही जातो. तिथे नाचतो. कुणाला मुलगा झाला तर आम्ही आशीर्वाद देतो; पण हा आशीर्वाद आम्ही परमेश्वराकडून मागतो. आमच्यापैकी अनेक जण निरक्षर आहेत. फक्त 20 टक्के तृतीय पंथीय साक्षर आहेत. 
रंजीता नायक, तृतीय पंथीय

Monday, 19 December 2011

वेबसाईटवरून खोटे पॅकेज विकून फसवणूक

हिंगोली -  मुंबईच्या बांद्रा भागात आर्यरूप टूरिझम ऍण्ड क्‍लब रिसोर्ट कंपनीच्या नावाखाली तीन महिन्यांत रक्‍कम तिप्पट करून देण्याचे पॅकेज विकून पंचवीस लाखांची फसवणूक केल्याबद्दल पुणे, कोल्हापूर व चंद्रपूर भागातील तेरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली तालुक्‍यातील निशाणा येथील श्रीराम शेषराव जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी - मुंबई येथील बांद्रा ईस्ट भागात सातारा जिल्ह्यातील खटाव येथील आरोपी रवींद्र देशमुख व वसुंधरा रवींद्र देशमुख यांच्यासह काही जणांनी आर्यरूप टुरिझम ऍण्ड क्‍लब रिसोर्ट ही कंपनी उघडली. त्यानंतर या कंपनीने www.airrupa.in ही वेबसाईट उघडली. आरोपी विश्‍वासराव देशमुख (मुंबई), रामचंद्र थोरात (पुणे), पुंडलिक इंगळे (सोलापूर), अतुल बाबाराव जाधव, कल्पना अतुल जाधव (चंद्रपूर), राहुल वाणी ऊर्फ राहुल पाटील (कोल्हापूर) यांच्यासह पाच संशियातांनी या वेबसाईटवरून पॅकेजची विक्री केली. या वेबसाईटवर कंपनीच्या स्कीमची प्रसिद्धी केली. त्यामध्ये नऊ हजार रुपये भरल्यास नव्वद दिवसांत सत्तावीस हजार रुपये मोबदला देणारी पॅकेज प्रदर्शित केले. यासोबतच पंचवीस हजार, पन्नास हजार, एक लाख, दीड लाख, तीन लाख व पाच लाख याप्रमाणे पॅकेज नव्वद दिवसांत तीनपट करून दिले जातील असे जाहीर केले. या स्कीममध्ये फिर्यादीसह परसराम मोरे (मसोड), नीळकंठ नामदेवअप्पा कापसे (लासिना) आदींनी हिंगोलीच्या बॅंक ऑफ बडोदामध्ये काम करणाऱ्या अतुल जाधव याच्यामार्फत पॅकेजमध्ये सहभाग घेतला.

त्यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी दीड हजार रुपये भरले. नंतर पॅकेजच्या रकमा जमा केल्या. नंतर नव्वद दिवसांचा कालावधी लोटल्यावर संबंधित खातेदाराच्या खात्यावर रकमा जमा झाल्याच नाही तेव्हा फिर्यादी श्री. जाधव यांनी मुंबई येथे जाऊन कंपनीच्या कार्यालयात भेट घेतली. तेव्हा तेथील अधिकारी राजेश पांडे यांनी कंपनी चांगल्यापद्धतीने काम करीत आहे असे सांगितले. सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम असल्याने पैसे जमा झाले नाहीत असेही सांगितले. नंतर दुसऱ्यांदा बेंगलोरमध्ये गुन्हा दाखल झाल्याने कंपनीचे अकांउंट लॉक झाले आहे असें सांगितले. राहुल पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील खातेदारांचे पैसे घेण्याचे जबाबदारी घेतली. गुन्हा दाखल केल्यास पैसे मिळणार नाहीत असेही सांगितले. या प्रकाराला कंटाळून अखेर श्री. जाधव यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. यावरून तेरा संशयित आरोपींच्या विरोधात 25 लाख 53 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर इंगोले तपास करीत आहेत.

Saturday, 17 December 2011

दिव्य मराठीचे "दिव्य ज्ञान" ... वसंत आबाजी डहाके यांच्या पुस्तकांची मनाने बदलली नावे...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वसंत आबाजी डहाके यांची निवड झाली. त्याची बातमी देताना दिव्य मराठीने आपल्या अगाध ज्ञानाची प्रचीती दिली. "सर्वत्र पसरलेली मुळट", शुण्यशेष, अधोलोक आणि मर्त्य, यात्रा हि पुस्तके डहाके यांच्या नावावर असल्याचे बातमीत लिहिले आहे. दिव्या मराठीच्या ज्या प्रतिनिधीने हा शोध लावला त्याने हे ज्ञान कुठून मिळवले हे सांगावे.
डहाके यांच्या पुस्तकांची नावे अशी :
कविता - योगभ्रष्ट (१९७२), शुभवर्तमान (१९८७), शून्:शेप (१९९६), चित्रलिपी (२००६)
कादंबरी - अधोलोक (१९७५), प्रतीबध्य आणि मर्त्य (१९८१)
लेखसंग्रह - यात्रा अंतर्यात्रा (१९९९), मालटेकडीवरून (२००९)
समीक्षा - समकालीन साहित्य (१९९२), कवितेविषयी (१९९९), मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती (२०११), मराठी समीक्षेची सद्यस्थिती (२०११).

Tuesday, 6 December 2011

पुरस्कारप्राप्त ‘साकेत’ प्रकाशनाच्या लबाडीचे ‘भागवत’ पुराण

औरंगाबादचे साकेत प्रकाशन ही एक मान्यताप्राप्त प्रकाशन संस्था. मागीलवर्षी महाराष्ट्र शासनातफेर् दिला जाणारा उत्कृष्ठ प्रकाशनासाठीचा ‘श्री.पु.भागवत’ पुरस्कार या प्रकाशनाला प्राप्त झाला. तसेच मुंबई साहित्य संघातर्फे दिला जाणारा ‘वि.पु.भागवत’ पुरस्कारही या संस्थेला यावर्षी प्राप्त झाला. साहजिकच या प्रकाशनाची ग्रंथव्यवहाराबाबत नैतिक जबाबदारी वाढली. यांच्याकडून अपेक्षाही वाढल्या. पुण्या मुंबईच्या बाहेर मराठी प्रकाशन व्यवसाय फारसा बहरला नाही. या दृष्टीने विचार करता साकेत प्रकाशनाने औरंगाबादला आपली संस्था स्थापन केली व वृद्धिंगत केली. 1500 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केलेली ही संस्था.
या प्रकाशनाच्यावतीने शिवराज गोर्ले यांची ‘दुरंगी’ या नावाची कादंबरी नुकतीच (डिसेंबर 2011) मध्ये प्रकाशित झाली. ही कादंबरी 1995 मध्ये ‘सामना’ नावाने इंद्रायणी साहित्य (पुणे) या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली होती.  मुक्त अर्थव्यवस्थेची पाठराखण करणारी मराठीतील पहिलीच कादंबरी म्हणून तेंव्हा तिचा गौरवही झाला होता. 
साहजिकच जेंव्हा या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली तेंव्हा हा सगळा उल्लेख त्यावर असावा अशी अपेक्षा होती. किमान हे पुस्तक पुर्वी कुठल्या प्रकाशनाने आणि कोणत्या नावाने प्रकाशित केले आहे हे नोंदवणे आवश्यक होते. पण तसे काहीच घडले नाही. पुस्तक चक्क पहिल्यांदाच निघते अशा आवेशात प्रकाशकांनी ते प्रकाशित केले आहे.
ज्या प्रकाशनाला मौजेच्या दोघाही भागवत बंधूंच्या नावाचा पुरस्कार प्राप्त झाला, ज्या भागवत बंधूंनी आयुष्यभर प्रकाशन व्यवसायाची नैतिकता जपली त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारणार्‍या साकेत प्रकाशनाला अशी लबाडी करायची का गरज भासली?
यातली गोम अशी की हे पुस्तक शासनाच्या खरेदीमध्ये, राजा राम मोहन रॉय योजनेच्या खरेदीत, विविध पुरस्कारांसाठी सादर होणार. त्याची खरेदी जर शासनाने इ.स.2011 मधील नवीन पुस्तक म्हणून केली तर या व्यवहाराला काय म्हणायचे? या पुस्तकाला एखादा पुरस्कार प्राप्त झाला तर काय करायचे?
या पुस्तकासाठी प्रकाशक म्हणून जी काही मेहनत इंद्रायणी साहित्यच्या श्याम कोपर्डेकरांनी केली असेल ती तर मातीतच गेली. त्याची भरपाई कशी करायची? पु.ल. देशपांडे यांची पुस्तके देशमुख आणि कंपनीने आधी प्रकाशित केली होती. त्यांच्या पुस्तकांच्या पुढच्या आवृत्त्या/ पुनर्मुद्रणे मौजेनं प्रकाशित केली पण आवर्जून त्यावर पहिल्या आवृत्तीचे प्रकाशक म्हणून देशमुखांचे नाव ठेवले. पण शिवराज गोर्ले किंवा साकेत प्रकाशन या दोघांनाही ही नैतिकता पाळाविशी वाटली नाही. या वृत्तीला काय म्हणावे?
साकेतच्या कैक प्रकाशनांवर आवृत्त्यांचे क्रमांकच नसतात. शासकीय खरेदी साठी चाललेली ही लबाडी सामान्य वाचकांच्या लक्षात येत नाही. पण निदान मोठमोठे प्रतिष्ठेचे पुरस्कार देणार्‍या संस्थांच्या तरी लक्षात यावी. आता 16 तारखेला मुबईमध्ये उत्कृष्ठ प्रकाशक म्हणून ‘वि.पु.भागवत’ पुरस्कार स्वीकारल्यावर साकेत प्रकाशन पुरस्काराला उत्तर काय देणार? नवीन प्रकाशकांपुढे काय आदर्श म्हणून ठेवणार? दुसर्‍यांच्या संहिता पैशाच्या जोरावर पळवा आणि परस्पर शासनाच्या ग्रंथखरेदीमध्ये घुसडून पैसे कमवा. शिवाय विविध पुरस्कार मिळवून प्रतिष्ठाही मिळवा. त्यासाठी कुठलीही मेहनत करण्याची गरज नाही. लेखकांना किती आवृत्या निघाल्या हे सांगण्याची आवश्यकता नाही.

Monday, 5 December 2011

वीणा मलिक करणार २० लाख डॉलरचा दावा

नवी दिल्ली : एफएचएम मॅगेझिनच्या कव्हरवर वीणा मलिकचा छापण्यात आलेला नग्न फोटो हा बनावट असून, आपण मॅगेझिनकडे २० लाख डॉलरचा अब्रु नुकसानीचा दावा करणार असल्याचं, वीणा मलिकच्या वकीलांनी म्हटलंय.
भारतीय मॅगेझिन एफएचएमने वीणा मलिकची फसवणूक केली असून, वीणा मलिकच्या मूळ फोटोत फेरफार करण्यात आले आहेत, असंही वीणा मलिकचा वकील अयाझ बिलावाला यांनी म्हटलंय.

एफएचएम मॅगेझिनच्या ज्या प्रतिंवर वीणा मलिकचा नग्न फोटो छापण्यात आला आहे, त्यासर्व प्रति परत करण्याची मागणी करण्यात आली आहे. वीणा मलिकचा फोटो फेरफार करून छापण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय.
वीणा मलिकच्या वकीलाने संबंधित मॅगेझिनवर अब्रु नुकसानीचा दावा म्हणून २० लाख डॉलरची मागणी करण्याच ठरवलंय.एचएफएमचे संपादक कबीर शर्मा यांनी हा दावा चुकीचा असल्याचं सांगितलंय. आपल्याजवळ फोटो शूटच्या वेळचा व्हिडीओ असल्याचं कबीर शर्मा यांनी म्हटलंय.

http://www.fhm.com 

Friday, 2 December 2011

...सरकारी अधिकाऱ्यांना नाचवलं सापांनी!

लखनौ - एखाद्या सरकारी कार्यालयात कामासाठी वारंवार खेटे घालूनही दाद घेतली जात नसेल तर काय करावं...? आणि समजा अनेक मिनतवाऱ्यांनंतर यदाकदाचित कुणी दाद घेतली, तरी काम करून देण्याच्या बदल्यात लाच मागितली तर...तर काय करावं? तर संबंधित कार्यालयात चक्क साप सोडावेत...! नाही, नाही, हा काही काम करवून घेण्याचा पर्याय मुळीचच होऊ शकत नाही...आणि तसं कुणी कुणाला सुचवूही नये...पण एके ठिकाणी खरंच असं घडलं आहे खरं!

हे जिथं घडलं ते राज्य आहे - उत्तर प्रदेश. गाव - हरय्या आणि ही "करामत' करणाऱ्या व्यक्तीचं नाव - हक्कुला. हक्कुलानं "हरय्या' या गावातील सरकारी अधिकाऱ्यांना अशा रीतीनं हरवलं!

हक्कुला आहे सर्पमित्र आणि त्याला उभारायचं आहे सर्पोद्यान. परिसरातील सरकारी कार्यालयांत घुसणारे साप पकडण्याचं काम तो गेली अनेक वर्ष करतो. पकडलेल्या सापांसाठी एक सर्पोद्यान असावं, अशी त्याची इच्छा आणि त्यासाठी छोटासा भूखंड मिळावा, ही मागणी. तहसीलदार कार्यालयाकडं ही मागणी करकरून तो थकून गेला...पण सरकारी अधिकाऱ्यांनी-कर्मचाऱ्यांनी काही त्याची दाद घेतली नाही. इकडं हक्कुलाचा राग मनातल्या मनात साठत गेला आणि तब्बल तीन डझन विषारी सापांच्या रूपानं बाहेर पडला! हक्कुलानं केलं काय, तर आजवर पकडून ठेवलेले हे सगळे साप त्यानं तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडून दिले. या प्रकारानंतर कार्यालयातील अधिकाऱ्यांना-कर्मचाऱ्यांना पळता भुई अक्षरशः थोडी झाली! जीव वाचवण्यासाठी काहींनी तर खिडक्‍यांमधून उड्याही घेतल्या. अन्य कामांसाठी कार्यालयात आलेल्या सामान्य नागरिकांनीही कार्यालयाबाहेर धूम ठोकत या "सर्पसंकटा'पासून स्वतःचा बचाव केला.

थोडक्‍यात, हक्कुलानं सगळं कार्यालय काही काळ असं पुंगीशिवायच नाचवलं...!

सर्पोद्यानासाठी भूखंडाची मागणी हक्कुला तीनेक वर्षांपासून करत होता...."पकडलेले साप ठेवायला जागा हवी आहे; तेव्हा छोटासा का होईना भूखंड आपल्याला मिळावा,' असं त्याचं म्हणणं. मात्र, "असा भूखंड देण्याची तरतूदच नाही,' असं ठेवणीतलं सरकारी उत्तर देऊन दर वेळी त्याची बोळवण केली जात असे. शेवटी हक्कुलानं तब्बल 36 साप अधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडून दिले...आणि नंतर हलकल्लोळ माजला...

हक्कुलाच्या मागणीविषयी तहसीलदार सुभाषमणी त्रिपाठी यांचं म्हणणं असं - "हक्कुलाविषयी आम्हाला सहानुभूती आहे; पण सर्पमित्राला भूखंड देण्याची तरतूदच नसल्यानं आमचाही नाइलाज होता. आता घडल्या प्रकारानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हक्कुलाला हंगामी स्वरूपाचा भूखंड देण्याचे प्रयत्न सुरू आहेत; पण हक्कुलानं जे काही केलं ते चुकीचं आहे, हेही आपण विसरता कामा नये.'' हक्कुलाच्या विरोधात स्थानिक पोलिसांकडं तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या सगळ्या प्रकारानंतर हक्कुलाला त्याची बाजू मांडायची आहेच. तो म्हणतो, "तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भूखंड देण्याची तयारी दाखविली होती; पण ते लाच मागत असल्यानं रागाच्या भरात मी हे कृत्यं केलं.''

आता, या लाचरूपी सापाचं करायचं तरी काय, याचं उत्तर मात्र कुणाकडंच नाही!

Tuesday, 22 November 2011

मद्यधुंद पत्रकाराचा अर्धनग्नावस्थेत जाहीर तमाशा

घाटंजी (जिल्हा यवतमाळ)
येथिल एका दैनिकाच्या तालुका प्रतिनिधीने दि. १२ नोव्हेंबरला  सायंकाळी सिनेमा टॉकीज चौकात अर्धनग्नावस्थेत चांगलाच धुमाकुळ घातला.
सुक्ते यांच्या चहा टपरीवर  एका पत्रकाराने जाऊन मद्यधुंद अवस्थेत जाऊन पानटपरी चालकास शिवीगाळ सुरू केली. टपरीवरील चहाचे कप फोडले व सामानाची नासधुससुरू केली तसेच सुक्ते यांची कॉलरही पकडली. एवढ्यावरच तो थांबला नाही तरत्याने आपली पँटही काढली आणी अर्धनग्न होऊन धिंगाणा घालणे सुरू केले.
यावेळी परिसरातील नागरीकांनी त्यास चांगलाच चोप दिला. सुरेश भोयर यांनी त्यास नागरीकांच्या तावडीतुन सोडविले. एका ठिकाणी नेऊन त्याचे अंगावर पाणी टाकुन नशा उतरविण्याचा प्रयत्न केला. तरी त्याची नशा उतरली नाही. त्याने पुन्हा तिथेच येऊन गोंधळ सुरूच ठेवला. यापुर्वी त्याने अशाच प्रकारे घोटी येथे एका परिचारीकेच्या घरी रात्री एक वाजता जाऊन दारास लाथा बुक्क्या मारून शिवीगाळ केली होती. या प्रकरणी पारवा पोलीस स्टेशन मध्ये त्याचेवर गुन्हे दाखल झाले आहे. सदर पत्रकार आपल्या वागणुकीत बदल न करता वारंवार असे प्रकार करीत आहे. या सर्व प्रकारामुळे जनतेमध्ये त्या पत्रकाराबाबत संताप व्यक्त होत असुन संबंधीत वर्तमानपत्राने अशा पत्रकारांवर वचक ठेवावा अशी मागणी होत आहे.

स...र...''काळ'' ऑन ''घोळ" करणारे वे ...

पुणे - पुण्यातील नंबर एकचे दैनिक म्हणवणाऱया एका वृत्तपत्राच्या मालकाचा आता एकच ध्यास आहे. आणि ते म्हणजे आपल्याकडे ''घोळ" करणारे शंभर ''वे'' पाहिजेत. त्यानुसार त्यांनी पिंपरी-चिंचवड कार्यालयात असा घोळ करणारा एक माणूस ठेवला आहे. जाहिरातीच्या नावाखाली खंडणी वसूल करणारा ह पत्रकार सध्या या दैनिकाच्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील बिल्डर आणि राजकारण्यांच्याकडे अक्षरशः खंडण्या वसूल करत फिरत आहे. त्यामुळे पत्रकारितेच्या इतिहासात नाव कोरलेल्या या  दैनिकाची पुरती बदनामी झाली आहे.

हा पत्रकार पूर्वी काम करणा-या दैनिकात टेलिफोन पुसण्याचे काम करत होता. परंतु, भावाच्या लग्नाला चक्क ३ हॅलिकॉप्टर घेऊन गेला होता. हाच त्याचा भाऊ आौरंगाबाद येथे एका उद्योजकाकडून खंडणी मागताना पोलिसांनी पकडला आहे. यापूर्वीच्या दैनिकात काम करताना दहा वर्षांपुर्वी रिसेपशनिस्टला याच पत्रकाराकडून दिवस गेले होते. नको ती झंजट म्हणून त्याने तिला दीड लाख रुपये व लग्नाचा खर्च दिला. लग्नानंतरही त्या रिशेप्शनिस्टसोबत त्याचे संबंध होते. आजही तो एखाद्या दैनिकातील चीफ रिपोर्टरला मिळणा-या महिन्याच्या पगारा इतक्या पैशांची नुसती दारु ढोसत असतो. आणि तो इतर पत्रकारांना हा दारूचा किस्सा अभिमानाने सांगतो. याची ''दलाल'' अशी आेळख असताना हा मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये येणा-या सर्व वरिष्ठ अधिका-यांना 'मी'चं आणल्याचे ठासून खोटे बोलत असतो. सध्या पुण्यातील नंबर एकच्या दैनिकात ''दुकानदारी'' करण्यासाठी आणलेला आणि बारावी सुद्धा पास नसलेला हा पत्रकार आठ आवृत्तीच्या संपादकांवर दादागिरी करू लागला आहे. या दैनिकातील प्रामाणिक पत्रकारांचे रिलेशन बाजारात विकण्यासाठी निघाला आहे. नुकत्याच झालेल्या मटका प्रकरणातून त्याने आणि ''कुठे कुठे'' खाऊ म्हणून कोणत्याही बातमीसाठी लोकांच्याकडून पैसे घेणा-या त्याच्या एका चेल्यामुळे या दैनिकातील एका प्रामाणिक पत्रकाराला स्वाभिमानाला ठेच पोचल्याने राजीनामा द्यावा लागला. त्याच्या या चेल्यामुळे पहिल्यापासून या दैनिकाची बदनामी होत आली आहे. तरीही त्याला प्रत्येकवेळी पाठीशी घालण्यात येत आहे. या पैसे खाऊ ''कुठे''ला आता हा दलाल पत्रकार वरिष्ठांच्याकडे प्रमोशनची शिफारस करत आहे. या प्रकरणाता बिच्चारे संपादक आणि आणखी एका वरिष्ठ अधिका-याला नाहक बदनाम व्हावे लागले.
शंभर ''घोळ'' करणा-या या दलाल पत्रकाराने एका महापालिकेची २ लाखांची जाहिरात देऊन ८ लाख रुपये उकळले होते. एका जागरुक नागरिकाने हे प्रकरण उघडकीस आणल्याने या दलाल पत्रकाराच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पुण्यातील एका नामांकित बिल्डरने मुंबईतील आदर्श शेजारील पाच एकरच्या प्लॉटचा काही भाग आरक्षित असताना तो मंत्रालयातून ''एनए" करून आणण्याची 'सुपारी' याला दिली होती.
राज्यात अलिकडे बनावट डॉक्टर व वकिलांवर कायदेशीर कारवाई होत आहे. परंतु बारावी पास असलेल्या आणि स्वतःच्या चेल्याला ''डमी'' बसवून पत्रकारितेची पदवी मिळविणाऱया पत्रकारावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न प्रामाणिक पत्रकारांना पडला आहे. बिल्डरांना धमकावून पत्रकारितेचे हत्यार वापरून जाहिरातीसाठी स्वत:च ठरविलेल्या दराने खंडण्या वसूल करणा-या या पत्रकाराला नंबर एकच्या दैनिकाची नव्याने सुरू होत असलेल्या स्वतंत्र आवृत्तीचा निवासी संपादक करण्यात येणार आहे. त्यामुळे या दैनिकाची आता ''काळ'' आली आहे, अशी चर्चा पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे. आता तो पुण्यातील ज्या नंबर एकच्या दैनिकात काम करतो तेथेच स्वतःची ''घोळ माझा'' (जीएम) एन्टरप्रायझेस नावाची जाहिरात एजन्सी सुरू केली आहे. या एजन्सीच्या नावाखाली वर्धानपदिनाच्या जाहिराती गोळा करताना मालकाचा फायदा करण्याऐवजी स्वतःचीच तुंबडी भरण्याचे उद्योग या पत्रकाराने सुरू केले आहेत. शहरातील सर्व बिल्डरांना आणि राजकाऱण्यांना दैनिकाच्या नावाचा वापर करून जाहिरातीसाठी धमकावू लागला आहे. या सर्व बाबी कानावर जाऊनही ज्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरते असा मालक त्या दलाल पत्रकारावरच मेहरबान आहे. या मालकाने दलाल माकडाच्या हाती कोलीत दिल्याने तो पाहिजे तेथे फिरवू लागला आहे.
स्वतंत्र आवृत्तीच्या नावाखाली शहरातील बिल्डर आणि राजकीय क्षेत्रातील सर्वांना धमकावून जाहिराती मिळविणाऱा हा पत्रकार आर. आर. पाटील, अजित पवार, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे (जीएम), दिलीप वळसे पाटील यांच्यासह मंत्रालयातील सर्व खात्याच्या सचिवांशी वैयक्तिक ''चेंबरमधील संबंध'' असल्याचे सर्वांना सांगत असतो. परंतु, अजित दादाबरोबर आपले चांगले संबंध असल्याचे हा पत्रकार सांगत असला तरी दादा या पत्रकारावर चांगलेच खार खाऊन आहेत. त्यामुळे इतर सर्व नेत्यांच्या फोनवरून बातम्या देणारा हा पत्रकार अजित दादांना मात्र कधीच फोन करून बातम्या घेत नाही. याची बातमीदारी विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रकाश आंबेडकर, आघाडीत बिघाडी, प्रचंड खळबळ, मवाळ पुतण्या, प्रबळ पुतण्या याच्या पलीकडे जात नाही. याची बातमी दिसली की पत्रकारही वाचत नाहीत आणि आता वाचकही वाचत नाहीत. छापून आल्यानंतर दुस-यांना फोन करून हाच विचारतो वाचली की नाही माझी बातमी. पिंपरीत स्वतंत्र आवृत्ती सुरू होणा-या नंबर एकच्या दैनिकातील जाहिरात, वितरण आणि संपादकीय विभागातील सहका-यांच्या बैठकीत या सर्वांची लायकी नसल्याचे तो तोंडावर सांगतो. पण यापूर्वीच्या दैनिकात काम करत असताना रिशेप्शनिस्टबरोबर अश्लील चाळे करताना आपल्या सहका-यांना सापडलेल्या या दलाल पत्रकाराने त्याची स्वतःची काय लायकी आहे, हे इतरांना जणू काही माहितच नसल्याच्या आविर्भावात बोलत असतो. यापूर्वीच्या दैनिकात लाखाची जाहिरात देऊन दुप्पट-तीप्पट वसूलीमुळे त्याची राजकारणी आणि बिल्डरांच्यात ख्याती झाली आहे. गेल्या पंधरा वर्षात त्याने अशा प्रकारे कोट्यावधीची माया कमविली आहे. टेलिफोन पुसणारा हा दलाल पत्रकार एवढी प्रगती करत असल्याने अशा प्रकारच्या इतर पत्रकारांनाही हुरूप आला आहे.
मध्यंतरी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या लायक मुलाला युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी याने पेड न्यूज (सुपारी )छापल्या. त्याचा मोबदला म्हणून या नेत्याने दैनिकाच्या ऑफिसमध्ये पंधरा लाख रुपयांची थैली एकाच्या हातून त्याला पाठविले होते. हा दलाल पत्रकार ती थैली हातात घेऊन संपूर्ण ऑफिसमध्ये मिरवित होती. सर्व सहका-यांना ही थैली दाखवत त्यांची टर उडवित होता. तब्बल ७८ वर्षांची परंपरा असलेल्या आणि ज्यांनी स्वतःच्या बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून या दैनिकाचे नाव पत्रकारितेच्या इतिहासात कोरले. सर्व तळागाळातील नागरिकांना बातम्यामध्ये स्थान दिले. असे पत्रकारितेतील हे आदराचे स्थान आज अस्तित्वात नाहीत. पण त्यांनीच सुरू केलेल्या या दैनिकात सध्या जो काही ''पिंपरी" पॅटर्न सुरू झाला आहे, तो पाहून नानासाहेब स्वर्गात अक्षरशः ढसाढसा रडत असतील.

Sunday, 20 November 2011

राज मास्तरांनी घेतली छडी; परीक्षेशिवाय तिकीट नाही

मुंबई -  महापालिकेच्या निवडणुकांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या "मनसे'च्या कार्यकर्त्यांना शनिवारी नवा मंत्र मिळाला. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी "नवनिर्माणा'ची छडी उगारली, तेव्हा आपल्याला आता पारंपरिक राजकारण सोडण्याशिवाय पर्याय नाही, अशीच भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात उमटली असेल. त्यामुळे शाळा-कॉलेजांत दिलेल्या परिक्षेसारखीच परीक्षा घेण्याच्या राज यांच्या निर्णयाला साऱ्यांनीच "मनसे' दाद दिली.

आगामी महापालिका निवडणुकीबाबत राज यांनी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ""महापालिका निवडणुकीसाठी तिकीट "फिक्‍स' असल्याच्या गैरसमजात कोणीही राहू नये. इतरांना "गिमिक' अथवा "स्टंट' वाटू दे; मनसेचे तिकीट मिळविण्यासाठी अगदी राज ठाकरेंनाही लेखी परीक्षा द्यावीच लागेल,'' असा धडा त्यांनी दिला. लिहिता-वाचता न येणाऱ्यांनी घरीच बसावे, असा छडीचा मार द्यायलाही ते विसरले नाहीत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचे गणित थोडेसे चुकले; पण मुंबई महापालिका निवडणुकीत ती कसर भरून काढू, असा इशाराच त्यांनी शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांना दिला. सभागृहात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे निवडणुकीचे तिकीट देण्याची प्रक्रिया राज यांनी स्पष्ट केली. उमेदवारी मिळण्यासाठी सर्व इच्छुकांना लेखी परीक्षा द्यावीच लागेल, असे त्यांनी ठासून सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठीही अशीच प्रक्रिया होईल, असे ते म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 4 डिसेंबरला सकाळी 11 ते साडेबारा या वेळेत इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल.

शहरातील इच्छुकांसाठी माटुंगा येथील डी. जी. रुपारेल महाविद्यालय आणि उपनगरातील इच्छुकांसाठी पार्ले येथील साठे महाविद्यालय ही परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षेत कॉपी अथवा इतर गैरप्रकार करणाऱ्यांनी घरी बसण्याची तयारी ठेवावी, असा सज्जड दमही राज यांनी दिला आहे.

""महापालिकेत प्रवेश करणारा मनसेचा लोकप्रतिनिधी अभ्यासू असला तरच नागरिकांचे प्रश्‍न सुटतील. त्यासाठी तयार केलेली संदर्भ पुस्तिका 1000 रुपयांत उपलब्ध करून दिली जाणार आहे. याच पुस्तिकेवर लेखी परीक्षा आधारित असेल; त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अंतिम मुलाखत मी स्वत: घेणार आहे'', असे राज यांनी जाहीर केले. त्या वेळी टाळ्यांचा कडकडाटात करून कार्यकर्त्यांनी या घोषणेचे स्वागत केले. एका प्रभागातील इच्छुकांनी एकाच गाडीतून परीक्षेच्या ठिकाणी जावे. ती गाडी त्यांनी लगेच परत पाठवून परीक्षा केंद्राच्या परिसरात वाहतूक कोंडी टाळावी, असा सल्लाही राज यांनी दिला.

अशी आहे आचारसंहिता
1.परीक्षा केंद्रात दोन तास आधी प्रवेश
2.परीक्षा सुरू झाल्यावर प्रवेश नाही.
3.कॉपी करणारा तत्काळ बाद.
4.परीक्षा प्रवेशपत्राशिवाय प्रवेश नाही.
5.एकाही कार्यकर्त्याला सोबत आणायचे नाही.
6.पेपर फोडण्याचा अजिबात प्रयत्न नको.
7.वशिलेबाजीचा प्रयत्न केल्यास "हद्दपार'.
8."डमी'चा प्रयत्न केल्यास "नापास'.
9.एका उमेदवाराला एकाच प्रभागातून अर्ज.
10.जातपडताळणी दाखला अनिवार्य.
11.परीक्षेच्या दीड तासाच्या काळात वर्गाबाहेर जाण्यास बंदी

Friday, 18 November 2011

बारबालांनी घातला नाशिकचे व्यापारी मुंदडा यांना गंडा

मुंबई -  नाशिकच्या एका व्यापार्‍याला मैत्रीच्या जाळ्यात अडकवून दोन बारबाला बहिणींनी त्याला तब्बल 55 लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी उमेश मुंदडा (47) यांनी फिर्याद नोंदवल्यानंतर दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी निशा ऊर्फ वंदना बाबुलाल राज (29) आणि तिची बहीण वर्षा राज (27) यांना अटक केली आहे.

मुंदडा यांचा नाशिकमध्ये घाऊक धान्य आणि स्टील विक्रीचा व्यवसाय आहे. मुंबईत कामानिमित्ताने त्यांचे नेहमीच येणे-जाणे असते. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित सुर्वे म्हणाले की, नऊ वर्षांपासून ग्रँट रोड येथील मिनर्व्हा जंक्शन येथील जंक्शन्स बारमध्ये ते येत असत. या दोघीही तिथेच काम करतात. 2004 पासून मुंदडा यांची या दोन बहिणींशी ओळख आहे. मैत्रीच्या नावाखाली निशा व वर्षा यांनी त्यांच्याकडून आतापर्यंत 40 लाखांची रोकड उकळली आहे. तसेच नातेवाइकाच्या लग्नाला हजर राहण्यासाठी या दोघींनी मुंदडा यांच्याकडून साडेपाच लाख रुपयांचे दागिने आणि मीरा रोड येथे फ्लॅट खरेदीसाठी 10 लाख 65 हजार रुपयांची रोख रक्कम घेतली. या पैशातून वर्षाने मीरा रोड येथील गीता हाइट्स इमारतीत 1015 चौरस फुटांचा फ्लॅट खरेदी केला. मे 2011 मध्ये मुंदडा यांनी आपल्या पैशाची मागणी केल्यानंतर पैसे परत करण्याऐवजी आणखी 15 लाख रुपयांची मागणी केली. त्यांच्या धमकावणीला कंटाळलेल्या मुंदडा यांनी धीर एकवटत अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या दोघींविरोधात विश्वासघात, फसवणूक, हत्येचा प्रयत्न आदी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वर्षा आणि निशाला मदत करणारा त्यांचा मेहुणा मनीष सिंग व त्याची बहीण बिंदिया सिंग फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

अजित पवारांची 'दादागिरी' युवकाच्या पथ्यावर


मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्यात पटाईत असले, तरी त्यांचा पहाडी आवाज मात्र त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनाही काहीसा खटकतो. त्यामुळे त्यांच्या जवळ जाऊन कैफियत मांडताना प्रत्येकांना त्यांच्याबाबतची आदरयुक्‍त दराऱ्याची भीती अधिक असते; मात्र आज (गुरुवार) त्यांच्या जनता दरबारात शिक्षकाची नोकरी मिळविताना फसवणूक झालेल्या बेरोजगार युवकाने दर्दभरी कहाणी ऐकवली. या युवकाची कैफियत ऐकून अजित पवार यांनी थेट संबंधित शिक्षण संस्थेच्या सचिवाला "दादागिरी'ची प्रचीती दाखविली.

पश्‍चिम महाराष्ट्रातील राजेश नावाचा युवक कोणाच्याही ओळखीशिवाय गुरुवारी राष्ट्रवादी भवनमधील दर गुरुवारी होणाऱ्या अजित पवार यांच्या जनता दरबारात हजर झाला होता. उच्च शिक्षण घेतलेल्या शेतकरी कुटुंबातील राजेशला एका खासगी संस्थेत शिक्षकाची नोकरी देण्याचे आमिष संबंधित शिक्षण संस्थेच्या सचिवांनी दिले. या बदल्यात राजेशकडून सहा लाख रुपये घेण्यात आले. जमिनीचा तुकडा विकून आणि काही कर्ज घेऊन राजेशने सहा लाख रुपयांची व्यवस्था केली. शिक्षकाची नोकरी मिळणार, या आशेने त्याचे लग्नही जमविण्यात आले; पण वर्ष लोटले तरीही संस्थाचालकाने नोकरी दिली नाही. अखेर नोकरी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राजेशने सचिवाकडून सहा लाख रुपये परत मागितले; मात्र एकदा दिलेले पैसे परत करणार नाही. तुला नोकरी कधीतरी देऊ, असे सांगत संस्थाचालकाने राजेशला रेंगाळत ठेवले.

ही सर्व कहाणी राजेशने अजित पवार यांच्या कानावर घातली. त्याच्याकडे पैसे घेतलेल्या संस्थेच्या सचिवांचा दूरध्वनी क्रमांक होता. अजित पवार यांनी लगेचच संबंधित सचिवाशी दूरध्वनीवर संपर्क साधला. "मी अजित पवार बोलतोय. तुम्ही राजेश नावाच्या युवकाकडून नोकरी देण्यासाठी सहा लाख रुपये घेतलेत का, असा करड्या आवाजात त्यांनी सवाल केला'. त्यामुळे पलीकडून पाचावर धारण बसलेल्या संस्थेच्या सचिवाने तत..पप.. करत उत्तरे दिली. पैसे घेतल्याची खात्री पटल्यावर, आज मी राजेशला तुमच्याकडे पाठवत आहे. त्याला त्याचे पैसे परत करा नाही तर तुमच्या मागे उद्यापासून पोलिसांना लावेल, असा सज्जड दम अजित पवार यांनी दिला.

संस्थेच्या सचिवाला सुनावल्यानंतर अजित पवार यांनी राजेशला जाण्यास सांगितले; शिवाय त्या सचिवाने पैसे परत दिले नाहीत, तर परत मला सांग. मी बघतो काय करायचे ते, असेही सांगितले. त्यानंतर राजेश समाधानाने घरी गेला.

Thursday, 17 November 2011

सामाजिक लोकशाही रुजविण्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची - भि.म.कौसल

भंडारा,- प्रसार माध्यमांची कामगिरी ही स्वातंत्र्य पूर्व काळापासून तर आजच्या आधुनिक काळापर्यंत चोखपणे सुरु आहे. पूर्वीच्या काळी व स्वातंत्र्यानंतर राजकीय जागृतीकरीता प्रसार माध्यम महत्वाची भूमिका सांभाळत होते. आज सामाजिक लोकशाही रुजविण्यात प्रसार माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. असे विचार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर-अमरावती विभागाचे संचालक भि.म.कौसल यांनी व्यक्त केले.
आज (ता.16) पत्रकार भवन येथे जिल्हा माहिती कार्यालय आणि भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्तवतीने राष्ट्रीय पत्रकार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री.कौसल बोलत होते. अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यकांत जाधव होते. प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ झाडीबोली साहित्यीक डॉ.हरिश्चंद्र बोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जे.एम.पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विकास ढोमणे यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम व माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पत्रकारिता सार्वजनिक जबाबदारीचे माध्यम यावर परिसंवाद आयोजित करण्यात आला.
अध्यक्षस्थानावरुन जाधव म्हणाले, पत्रकारिता हे सार्वजनिक जबाबदारीचे माध्यम कसे ठरेल यादृष्टीने पत्रकारांनी विचारमंथन केले पाहिजे. समाजाला प्रबोधन करणारे लेखन पत्रकारांनी करावे, असे ते म्हणाले. 
डॉ.बोरकर म्हणाले, पत्रकारांनी सांस्कृतिक घडामोडीचे प्रतिबिंब वृत्तपत्रामधून उमटवावे. लुप्त होत असलेल्या लोककलांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. संस्कृतिचे जतन कसे करता येईल याकडेही प्रसार माध्यमानी लक्ष द्यावे. 
प्राचार्य डॉ.ढोमणे म्हणाले, आधुनिक काळातील पत्रकारिता व शैक्षणिक क्षेत्रातील पत्रकारिता ही सार्वजनिक जबाबदारीचे माध्यम कसे करता येईल याची अनेक उदाहरणे देवून पत्रकारितेची उपयोगीता उपस्थितांना पटवून दिली.
डॉ.माले म्हणाले, पत्रकारांनी सकारात्मक दृष्टीकोन अधिक ठेवून नकारात्मक बाजू तपासावी, जेणे करुन पत्रकारांची भूमिका ही पारदर्शक बनेल. आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकार सार्वजनिक जबाबदारी स्विकारत असतांना स्वत:च्या आरोग्याकडे अधिक दुर्लक्ष करीत असल्यामुळे स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. 
पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी पत्रकार दिवसाचे महत्व सांगून वाढत्या महागाईमुळे वृत्तपत्र काढतांना संपादक व मालकांना कठीण ठरत असले तरी एक सार्वजनिक जबाबदारी म्हणून वृत्तपत्रे कार्य करीत असल्याचे सांगीतले. 
यावेळी जेष्ठ पत्रकार वामनराव तुरीले, गोपू पिंपळापूरे यांनीही विचार व्यक्त केले. प्रारंभी दिवंगत पत्रकार रमेश चेटूले व कांचन देशपांडे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. 
पत्रकारांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबीराचे फित कापून उद्घाटन संचालक भि.म.कौसल यांनी केले. यावेळी मान्यवर व पत्रकार उपस्थित होते. नेत्र चिकित्सक शेंडे व ईसीजी तंत्रज्ञ संदिप अवसर यांनी सहकार्य केले. 
कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार नंदकुमार राही, अशोक चचडा, हिवराज उके, ललितसिंह बाच्छिल, काशिनाथ ढोमणे, मिलींद हळवे, इंद्रपाल कटकवार, देवानंद नंदेश्वर, प्रमोद नागदेवे, प्रा.नरेश आंबिलकर, चंद्रकांत श्रीकोंडवार, संजिव जयस्वाल, तथागत मेश्राम, सुरेश शेन्डे, प्रफुल्ल घरडे,राजेश उरकुडे, रवि भोंगाने, सुनिल चौरसिया, सुरेश कोटगले, परमेश्वर शेन्डे, राजु आगलावे, नरेंद्र बोंद्रे, विलास केजरकर, देवाजी गजभिये, यशवंत थोटे, दिपक रोहणकर, विरेंद्र गजभिये, पृथ्वीराज बन्सोड, श्री.चव्हाण, छायाचित्रकार सुरेश फुलसुंगे, जिल्हा माहिती कार्यालयाचे मानीक कन्हाके, बसंत मडामे, घनशाम खडसे, गणेशदास तलमले, शंकर शेन्डे, घनशाम सपाटे, रेखा निनावे, प्रशांत केवट यांचेसह अनेकांची उपस्थिती होती. संचालन प्रा.बबन मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार डि.एफ.कोचे यांनी मानले