Sunday 13 November 2011

फेसबुकवर समस्यांचं समाधान

बीड : सोशल नेटवर्किंग साईटचा वापर दिवसेंदिवस झपाट्याने वाढतोय. मात्र याचा वापर केवळ टाईमपाससाठी न करता विकास कामांवर चर्चा करण्यासाठी केली जातोय. फक्त शहरी नाही तर ग्रामीण भागात हे शक्य झालंय. अंबाजोगाईच्या तरूणांनी फेसबुकच्या माध्यमातून शहरातील समस्या मांडायला सुरुवात केली आहे आणि समस्या सोडवूनही घेतल्या आहेत.

तिकडे लंडन मध्ये फेसबुकच्या आती वापरामुळे शाळकरी मुलांमध्ये आळस वाढत चाललाय असा निष्कर्ष काढण्यात आलाय. तर भारतात ही फेसबुकचा वापर अगदी गावागावात पोहचलाय. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईत तरूणामध्येही ही क्रेझ आलीय. पण या तरुणांनी या फेसबुकचा वापर विधायक कामांसाठी करयाला सुरुवात केली आहे. न

नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असतांना या तरुणांनी अंबाजोगाई नगरपालिका निवडणूक २०११ हा ग्रुप सुरु केलाय. अवघ्या एका महिन्यात या ग्रुपसोबत तेराशे मेंबर जोडले गेलेत. यात शहरातील सगळ्या नगरसेवकांपासून डॉक्टर, वकील आणि महाविद्यालयीन तरुणांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे हे सगळे लोक मोबाईल वरतीच नेट वापरतात. अंबाजोगाईतील अभिजित जगताप या तरुणाने हा ग्रुप सुरु केलांय, आता मात्र ही चळवळ बनलीय.

नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा हा ग्रुप तयार करण्यात आल्याने शहरातील सगळ्या नगरसेवकांना आप आपली विकासकामे यात मांडण्यासबंधी आव्हान करण्यात आले. सुरुवातीला याला फारसा रीस्पोंस मिळला नाहीं मात्र. शहरातील समस्या मांडून त्यावर चर्चा व्होऊ लागल्याने या वर माहिती टाकण्यासाठी लोक प्रतिनिधी पुढे सरसावले. आता तर लोकात जावून निवडणुका लढवायच्या असल्याने सकाळी हातात पेपर येण्याअगोदर आता राजकारणी फेसबुक चेक करतात.

शहरातील रस्त्यांची दुर्दशा फेसबुकवर आल्यानंतर लगेच नगरसेवक जागे झाले आणि शहरातील विश्रामगृहासमोरील रस्ता दुरुस्त झाला. रस्ता असो की पिण्याचे पाणी स्वच्छता असो की अतिक्रमण, ही सगळी प्रश्न असोत नागरिक यावर फेसबुकच्या माध्यमातून बिनधास्त बोलू लागलेत. म्हणूनच फेसबुकमुळे लोक प्रतिनिधीची जवाबदारी ही तितकीच वाढलीय.

उच्चशिक्षित माणसाच्या शहरात मतदानविषयीची अनास्था असलेली पहायला मिळते. नुकत्याच झालेल्या पुण्यातील खडकवासला मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीवरून हे पुन्हा एकदा समोर आलेय. म्हणूनच फेसबुकवरचा हा ग्रुप जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे, यासाठी प्रबोधन करण्याच्या तयारीत आहेत.

एरव्ही आपल्या गावात काय चाललेय हे वृत्तपत्रातून समजते, मात्र आपल्या गल्लीत काय चाललेय, हे फेसबुकमुळे कळायला लागल्याने अंबाजोगाई बाहेर राहणाऱ्या तरुणांना ही फेसबुकचा हा कट्टा म्हणजे हक्काचे व्यासपीठ मिळालेय. सुरुवातीला या ग्रुपला एवढा प्रतिसाद मिळेल असे या तरुणांना वाटले नव्हते, आता मात्र फेसबुकशिवाय हे तरुण राहूच शकत नाहीत.

जे नवं ते आम्हाला हवं या ओढीने सध्याची तरुणाई झपाटलीय. मात्र नवीन नवीन केवळ अप्रुप म्हणून हे न वापरता फेसबुकचा वापर जर विधायक गोष्टींसाठी झाला तर विकास कामांवर चर्चा करण्यासाठी हे मोठे व्यासपीठ बनू शकतं.